Adx
set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,
Q.१. केवळ लिखित/मुद्रित संहितेपेक्षा प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये कोणत्या घटकामुळे अर्थामध्ये वेगळेपणा येतो ?
(A) वाचिक अभिनय
(B) शब्दयोजना
(C) वाक्यरचना
(D) लक्षणेचा वापर
Q.२. भाषिक नियमोल्लंघन हे साहित्याच्या भाषेचे एक वैशिष्ट्य मानले जाते; मात्र त्यामुळे अभिव्यक्तीत अडथळा येण्याऐवजी सूक्ष्मता व वेगळेपणाच येतो.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) संपूर्ण विधान चुकीचे
Q.३. पुढीलपैकी कोणती सर्वनामे तृतीया विभक्तीत शून्य प्रत्यय घेतात ?
(A) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी
(B) प्रथमपुरुषी व तृतीयपुरुषी
(C) द्वितीयपुरुषी व तृतीयपुरुषी
(D) वरीलपैकी सर्व
Q.४. ‘वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्टानने जन्मस्थान पुरस्कार दिला.’
या वाक्यातील अधोरेखित काय आहे ?
(A) कर्ता
(B) प्रत्यक्ष कर्म
(C) अप्रत्यक्ष कर्म
(D) विशेषण
Q.५. पुढीलपैकी कोणता प्रकार सर्वनामाचा नाही ?
(A) पुरुषवाचक
(B) दर्शक
(C) समुदायवाचक
(D) संबंधी
Q.६. पुढीलपैकी कोणता शब्दालंकार नाही ?
(A) यमक
(B) अनुप्रास
(C) अतिशयोक्ती
(D) चित्र
Q.७. भाषाकुलाची संकल्पना पुढे येण्यास कोणत्या अधिवेशनातील निबंधवाचन कारणीभूत झाले ?
(A) इ.स. १९०० चे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडियाचे अधिवेशन
(B) इ.स. १८७६ चे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे अधिवेशन
(C) इ.स. १७८६ चे एशियाटिक सोसायटीचे अधिवेशन
(D) इ.स. १७८६ चे लिंग्विस्टिक सोसायटीचे अधिवेशन
Q.८. ‘आईने दिवाळीसाठी करंज्या केल्या’
- या वाक्यात किती पदिम आळे आहेत ?
(A) चार
(B) पाच
(C) सहा
(D) नऊ
Q.९. ऐतिहासिक भाषाभ्यासपद्धतीचे उद्दिष्ट काय असते ?
(A) भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना
(B) मानवी भाषेच्या उगमाविषयीचे सिद्धांत
(C) भाषांच्या इतिहासाच्या आधारे भविष्याबाबतचा अंदाज बांधणे
(D) भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे
Q.१०. समाजभाषाविज्ञान ही शाखा पुढीलपैकी कशाचा अभ्यास करते ?
(A) भाषेच्या सामाजिक संदर्भातील आविष्काराचा
(B) भाषिक आविष्कारातील समाजाचा
(C) भाषेच्या व्यवस्थेचा
(D) वरील सर्व विषयांचा
Q.११. विविध प्रादेशिक बोलींमध्ये भौगोलिक अंतरामुळे परस्पर आकलनक्षमता नसली, तरी एक स्थानिक बोली आणि प्रमाणभाषा यांच्यात परस्परांमध्ये आकलनक्षमता असते.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) संपूर्ण विधान चुकीचे
Q.१२. माहिती तंत्रज्ञानामुळे वक्ता आणि श्रोता यांच्यातील स्थळाचेच नव्हे, तर काळाचेही अंतर मिटले आहे.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) संपूर्ण विधान चूक
Q.१३. वारकरी कीर्तनात काल्यानंतर सादर केल्या जाणाऱ्या कलाप्रकारास काय म्हणतात ?
(A) काल्याचे कीर्तन
(B) भारुड
(C) बोहाडा
(D) लळीत
Q.१४. बोहाडा हे विधिनाट्य आहे, मात्र त्यात देवतावतरण, देवतासंचार, संचारी नृत्यनाट्य नसते.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
(D) संपूर्ण विधान बरोबर
Q.१५. “ज्यात भारलेले गूढ व्यक्त झाले आहे ते भारुड.” अशी भारुडाची व्याख्या कोणी केली ?
(A) ल. रा. पांगारकर
(B) विनोबा भावे
(C) वि. ल. भावे
(D) ल. रा. नसिराबादकर
Q.१६. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवले जाते ?
(A) दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका
(B) मुक्तशब्द
(C) पंचधारा
(D) अक्षरवाङ्मय
Q.१७. “भोळ्या भाबड्या, श्रद्धाळू, गतानुगतिक व अज्ञ सामान्य जनांना ज्ञानाचा नवा प्रकाश देण्याऐवजी त्यांची पारंपारिक श्रद्धास्थानानेच बळकट करण्याचा प्रयत्न श्रीधर कवीने केला.” हे मत कोणाचे आहे ?
(A) यु.म. पठाण
(B) गं.बा. सरदार
(C) भगवंतराव देशमुख
(D) श्री.ना. बनहट्टी
Q.१८. कोणत्या कीर्तन प्रकारात आख्यान नसते ?
(A) कोणत्याच कीर्तन प्रकारात आख्यान नसते
(B) वारकरी कीर्तन
(C) समर्थ कीर्तन
(D) नारदीय कीर्तन
Q.१९. “व्हा, व्हा सावध, उठ बंधुनो, सूर्य उदय झाला |
सुधारणेची प्रभा फाकली भारत खंडाला ||”
- ही रचना कोणाची आहे ?
(A) हरिभाऊ तोरणे
(B) भीमराव करडक
(C) किसन फागुजी बनसोडे
(D) गणेश आकाजी गवई
Q.२०. “एस. म. जोशींसारख्या साऱ्या देशावर प्रेम करणारा, लोकशाहीवर शंभर टक्के विश्वास असणारा, अहिंसा आणि सत्याग्रह ह्याविषयी आग्रही असणारा नेता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला मिळाला, हे मराठी व भारतीय लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे.”
- हे विधान कोणाचे आहे ?
(A) शाहीर लीलाधर हेगडे
(B) शाहीर इमाम शेख
(C) शाहीर कृष्णकांत जाधव
(D) शाहीर किसनराव हिंगे
Q.२१. भक्तिप्रधान साहित्याची लोकप्रियता का वाढते आहे ?
(A) शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे
(B) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे
(C) तंत्रज्ञानाचे लोकमानसावर झालेले आक्रमण
(D) सुलभ व जलद मुद्रणव्यवस्थेमुळे
Q.२२. ‘केसाळ काळभोर पिल्लू’, ‘शामा’, ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या साहित्यकृतीसंबंधी निर्माण झालेल्या वादळामागील समान कारण कोणते ?
(A) दुर्बोधता
(B) श्लील-अश्लीलते संबंधीची भूमिका
(C) वेगवेगळ्या संघटनांचा विरोधी दृष्टीकोन
(D) तत्कालीन शासनाची भूमिका
Q.२३. “राष्ट्रवादाचे स्वछंदतावादी स्वरूप आणि वाङमयेतिहासतील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला” हे मत कुणाचे ?
(A) रॉय पास्कल
(B) एस. एस. प्रावर
(C) रेने वेलेक
(D) वसंत बापट
Q.२४. रत्नाकर मतकरी यांचे ‘आरण्यक’ हे नाटक आणि धर्मवीर भारती यांचे ‘अंधा युग’ हे नाटक यांच्या तुलनेचा आधारतळ कोणता ?
(A) समान तत्वप्रणाली
(B) समान आधारसामग्री
(C) समान प्रेरणास्थान
(D) प्रभाव
Q.२५. ‘विश्वसाहित्य’ ही संकल्पना भारतात कोणी प्रथम मांडली ?
(A) विनयकुमार सरकार
(B) रवींद्रनाथ ठाकूर
(C) अरविंद घोष
(D) बुद्धदेव बोस
Q.२६. ‘अभंग’ या रचनाप्रकाराला काही अन्य प्रयोजनासाठी पुढीलपैकी कोणत्या कवीने नवीन रूप दिलेले नाही ?
(A) बा.सी. मर्ढेकर
(B) विंदा करंदीकर
(C) अरुण कोलटकर
(D) मधुकर केचे
Q.२७. ‘यमुनापर्यटन’ या पहिल्या भारतीय कादंबरीचा गौरव करताना भालचंद्र नेमाडे यांनी तिच्या कोणत्या गुणवैशिष्ट्यावर भर दिला आहे ?
(A) समकालीन समाजचित्रण
(B) नायिकेची कृतिशीलता
(C) संवादातील भाषा
(D) चित्रमय वर्णन
Q.२८. भाषांतर करताना प्रादेशिक संदर्भ कसे अडचणीत ठरतात याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते ?
(A) केशवसुतांची ‘नैऋत्येकडील वारा’ ही कविता
(B) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक ‘कीचकवध’
(C) हरी नारायण आपटे यांची कथा ‘काल तर मोठा कठीण आला’
(D) बाबा पदमनजी यांची कादंबरी ‘यमुना पर्यटन’
Q.२९. मराठीमध्ये हायकू ह्या काव्यप्रकाराचा प्रारंभ कोणी केला ?
(A) ज्ञानेश्वर मुळे
(B) शिरीष पै
(C) केशवकुमार
(D) दत्तू बांदेकर
Q.३०. कार्ल मार्क्स यांची तत्वप्रणाली ही पुढीलपैकी कोणत्या साहित्याचे प्रेरणास्थान नाही ?
(A) ग्रेसची कविता
(B) विंदा करंदीकर यांची कविता
(C) डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्या
(D) अरुंधती रॉय यांची कादंबरी ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’
Q.३१. “भारतीय साहित्य एकच आहे. परंतु ते अनेक भाषांमधून लिहले हे कोणाचे वचन आहे ?
(A) बुद्धदेव भट्टाचार्य
(B) शिशिरकुमार दास
(C) अमिय देव
(D) डॉ. राधाकृष्णन
Q.३२. ‘मिल्टॉनिक सॉनेट’ मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात अशी असते ?
(A) दहा आणि चार
(B) आठ आणि सहा
(C) बारा आणि दोन
(D) नऊ आणि पाच
Q.३३. लोककथांचा तौलनिक अभ्यास करून त्यांची सूची तयार करणारा फिनलँडचा अभ्यास कोण ?
(A) जेम्स फॅरेर
(B) सी. एस. बर्न
(C) अँटी अर्ने
(D) फँज बोआस
Q.३४. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा
सूची – १
(i) लोकसाहित्य की भूमिका
(ii) लोकसाहित्य का अध्ययन
(iii) लोकसाहित्य
(iv) लोकसाहित्यविज्ञान
सूची – २
(1) विद्या चव्हाण
(2) सत्येंद्र
(3) कृष्णदेव उपाध्याय
(4) त्रिलोचन पांडे
(5) तोरू दत्त
संहिता :
(A) (i)–(4), (ii)–(2), (iii)–(5), (iv)-(5)
(B) (i)–(5), (ii)–(1), (iii)–(2), (iv)-(3)
(C) (i)–(3), (ii)–(4), (iii)–(1), (iv)-(2)
(D) (i)–(5), (ii)–(3), (iii)–(2), (iv)-(1)
Q.३५. ‘Mythology is the disease of language’ असा लोकसाहित्याच्या अभ्यासातील विचार कोणी मांडला ?
(A) जेकब ग्रिम
(B) विल्हेम ग्रिम
(C) फ्रीडरिक मॅक्सम्यूलर
(D) रॉबर्ट ब्राऊन
Q.३६. ‘अपौरुषेय वाङ्मय’ हा ग्रंथ कोणाचा आहे ?
(A) ना. रा. शेंडे
(B) अंबुबाई गोखले
(C) कमलाबाई देशपांडे
(D) सुशीलाबाई नवरे
Q.३७. “चातुर्वण्याचे स्वागत असो
धर्मांधतेचे स्वागत असो
विषमतेचे स्वागत असो
पण हे पशुपक्ष्यांनो
तुमचे मात्र स्वागत कर्ता येत नाही
- या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ?
(A) प्रल्हाद चेंदवणकर
(B) लोकनाथ यशवंत
(C) त्र्यंबक सपकाळे
(D) अरुण काळे
Q.३८. ‘हुंकार वेदनेचे’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?
(A) उषा भालेराव
(B) ज्योती लांजेवार
(C) उषा अंभोरे
(D) हिरा बनसोडे
Q.३९. “दलित आत्मकथेने सामाजिक–सांस्क्रूतिक संघर्षाचे दस्तावेज होत तथापि रूढ मराठी आत्मचरित्राचे आवर्तन भेदण्याचे कार्य दलित आत्मकथानांनी केले आहे”
(A) संपूर्ण विधान चूक आहे
(B) संपूर्ण विधान बरोबर आहे
(C) विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
Q.४०. “विचारांचं वावडं नसलं तरी माझा पिंड वैचारिक नाही. सृजनशील लेखनाला वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे असं मला कधीच वाटलं नाही.” हे विधान कोणाचे ?
(A) व्यंकटेश माडगुळकर
(B) रा.रं. बोराडे
(C) उद्धव शेळके
(D) प्रतिभा इंगोले
Q.४१. कोणत्या कादंबरीला गांधीहत्येची पार्श्वभूमी आहे ?
(A) धग
(B) वावटळ
(C) टरफुला
(D) बनगरवाडी
Q.४२. “ना.सी. फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब ग.ल. ठोकळ यांच्या कथेत दिसते.”
– हे विधान कोणाचे ?
(A) नागनाथ कोत्तापल्ले
(B) इंदुमती शेवडे
(C) वासुदेव मुलाटे
(D) भालचंद्र फडके
Q.४३. पुढीलपैकी कोणत्या दृष्टीकोनातून पूर्वीपासून वाङमयेतिहास लिहिला जात होता ?
(A) स्त्रीवादी
(B) व्यक्तीकेन्द्री
(C) मार्क्सवादी
(D) विद्रोही
Q.४४. वाङ्मयाकडे पाहण्याचे नवे दृष्टीकोन. नव्या अर्थान्वायाच्या पद्धती सतत पुढे येत असल्या तरी वाङमयेतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते :
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
(D) संपूर्ण विधान चुकीचे
Q.४५. सर्व इतिहास हा समकालीन इतिहासच असतो, ही भूमिका कोणाची ?
(A) हेगेल
(B) कान्ट
(C) क्रोचे
(D) इ.एच.कार
Q.४६. साहित्यकृतीला भूतकाळाच नसतो. ती वर्तमानकाळात नांदणारी एक सार्वकालीन घटना असते. म्हणून अशाप्रकारच्या भूतकाळात जमा न होणाऱ्या अनन्यसाधारण, स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिता येत नाही, अशी विचारसरणी कोणी मंडळी ?
(A) डब्ल्यू. एच. केर
(B) रोमान इनगार्देन
(C) वॉल्टर बेंजामिन
(D) डब्ल्यू. बी. येट्स
Q.४७. “एक देश भूमी थोर : एक देश मनुष्ये थोर : एक देश ऐश्वर्ये थोर : एक देश सामर्थ्ये थोर :” हा महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ?
(A) चक्रधर
(B) भास्करभट्ट
(C) पण्डित विश्वनाथ
(D) विश्वनाथबास बिडकर
Q.४८. पुढीलपैकी कोणता ग्रंथ एकनाथांनी लिहिला नाही ?
(A) भागवत
(B) भावार्थरामायण
(C) संक्षेपरामायण
(D) रुक्मिणीस्वयंवर
Q.४९. “बा मुनिदेया, हें थोर नगर : एथ तुम्ही चुकाल : बिढारासी जाओं या :” हे लीळाचरित्रातील – एकांकातील वर्णन कोणत्या नगराचे आहे ?
(A) पंढरपूर
(B) फलटण
(C) ऋध्दिपूर
(D) पैठण
Q.५०. धाव घाली विठू आता चालू नको मंद |
बडवे मज मारिती ऐसा काही अपराध ||
- असा धावा कोणी केला ?
(A) जनाबाई
(B) सोयराबाई
(C) मुक्ताबाई
(D) चोखामेळा
Q.५१. पुढीलपैकी कोणते चरित्र न.र.फाटक यांनी लिहिले नाही ??
(A) महादेव गोविंद रानडे
(B) कृ. प्र. खाडिलकर
(C) आगरकर
(D) आदर्श भारतसेवक
Q.५२. पुढीलपैकी सुबोध जावडेकर यांचा विज्ञानकथांचा संग्रह कोणता ?
(A) व्हर्चुअल रिअॅलिटी
(B) दुसरा आईनस्टाईन
(C) अंतराळातील भस्मासुर
(D) आकाशभाकिते
Q.५३. मराठी – मराठी पर्यायी शब्दांचा कोश कोणी सिद्ध केला ?
(A) प्र. न. जोशी
(B) वि. शं. ठकार
(C) द. ह. अग्निहोत्री
(D) मो. वि. भाटवडेकर
Q.५४. पुढीलपैकी वि. भि. कोलते लिखित आत्मचरित्र कोणते ?
(A) कृतज्ञ मी कृतार्थ मी
(B) अजून चालतोची वाट
(C) आनंदयात्रा
(D) जडणघडण
Q.५५. पुढील काव्यसंग्रह प्रकाशनकालानुसार लिहा :
वनफुल, कविता, बोलगाणी, खूणगाठी
(A) कविता, बोलगाणी, वनफूल, खूणगाठी
(B) कविता, वनफूल, खूणगाठी, बोलगाणी
(C) वनफूल, खूणगाठी, कविता, बोलगाणी
(D) वनफूल, बोलगाणी, कविता, खूणगाठी
Q.५६. खानोलकरांच्या कादंबरीत भावकाव्यात्म होण्याच्या शक्यता/क्षमता आहोत; तथापि भावकाव्यात्म कादंबरी लिहिणारे यशस्वी लेखक पु.शि. रेगे होत.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(C) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
(D) संपूर्ण विधान चूक
Q.५७. पुढीलपैकी अनंत काणेकर लिखित नाटक कोणते ?
(A) सरलादेवी
(B) उसना नवरा
(C) घरकुल
(D) आंधळ्यांची शाळा
Q.५८. ‘निकाय’ हे नियतकालिक कोणत्या साहित्य चळवळीशी संबंधित होते ?
(A) जनसाहित्य चळवळ
(B) लघुनियतकालिकांची चळवळ
(C) दलित साहित्य चळवळ
(D) आदिवासी साहित्य चळवळ
Q.५९. १९७७ मध्ये ग्रामीण साहित्याचा पहिला मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता ?
(A) कोल्हापूर
(B) पुणे
(C) प्रवरानगर
(D) बारामती
Q.६०. यांत्रिकीकरणामुळे कृषिसंस्कृतीवर होणाऱ्या परिणामाचे चित्रण कोणत्या कादंबरीत आढळते ?
(A) टारफुला
(B) गोतावळा
(C) लिगाड आणि खांदेपालट
(D) आंबी
Q.६१. “दलित साहित्याला जशी स्वतःची भूमिका आहे, व्याप्ती आहे, आशयघनता आहे, व्यापकता आहे किंवा शोषणपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वर्णवर्चस्वाखाली रागडल्या गेलेल्या मनाचा ठोसपणे हुंकार आहे तसे काही ग्रामीण साहित्याला आहे?” असा प्रश्न कोणी उपस्थित केला होता ?
(A) रा.रं. बोराडे
(B) भास्कर चंदनशिव
(C) महावीर जोंधळे
(D) चंद्रकुमार नलगे
Q.६२. शेतकरी चळवळीत सक्रीय राहून ग्रामीण साहित्य निर्मिती करणारे लेखक कोण ?
(A) बी. रघुनाथ
(B) सदानंद देशमुख
(C) रा.रं. बोराडे
(D) भास्कर चंदनशिव
Q.६३. १९८१ चे तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते ?
(A) कोपरगाव
(B) औरंगाबाद
(C) प्रवरानगर
(D) धुळे
Q.६४. ‘दोन क्रांतिवीर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
(A) व्यंकटेश आत्राम
(B) एकनाथ साळवे
(C) माधव सरकुंडे
(D) गोविंद गोरे
Q.६५. दुसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले ?
(A) यवतमाळ
(B) वणी
(C) चंद्रपूर
(D) भद्रावती
Q.६६. ‘दलित साहित्याचे निराळेपण’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(A) बाबुराव बागुल
(B) प्रभाकर मांडे
(C) दत्ता भगत
(D) यशवंत मनोहर
Q.६७. ‘दलित आदिवासी ग्रामीण’ साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते ?
(A) वैजापूर
(B) येवला
(C) कोपरगाव
(D) साक्री
Q.६८. ‘खोली पाहिजे’ हे कामगारांच्या घरांच्या समस्या मांडणारे नाटक कोणी लिहिले ?
(A) ग. कृ. जोशी
(B) मा. कृ. जोशी
(C) नागेश जोशी
(D) वसंत दूदवाडकर
Q.६९. पुढीलपैकी कोणत्या लेखिकेची ओळख स्त्रीवादी लेखिका म्हणून नाही ?
(A) नीरजा
(B) आशा बगे
(C) प्रज्ञा दया पवार
(D) अश्विनी धोंगडे
Q.७०. आंबेडकरी विचार पचवलेला आणि त्या विचाराचे भक्कम पाठबळ लाभलेला ‘सुर्यलिपी’ हा काव्यसंग्रह कुणाचा ?
(A) केशव मेश्राम
(B) शरणकुमार लिंबाळे
(C) शशिकांत हिंगोणेकर
(D) भास्कर कांबळे
Q.७१. नागरजीवनातील उच्चमध्यमवर्गाच्या स्खलनशीलतेचे चित्रण करणारी कादंबरी कोणती ?
(A) अंधारवाटा
(B) अदेशी
(C) उध्वस्त
(D) बोनसाय
Q.७२. जैन कवी आणि त्यांचे काव्यग्रंथ यांच्या योग्य जोड्या जुळवा :
सूची-I
(i) वीरनंदी
(ii) हरिश्चंद्र
(iii) धनंजय
(iv) वाग्भट्ट
सूची-II
(1) यशोधर काव्य
(2) नेम निवार्ण
(3) धर्मशर्माभ्युदय
(4) चंद्रप्रभाववर्णन
(5) द्विसंधान
संहिता :
(A) (i)–(2), (ii)–(3), (iii)–(5), (iv)-(1)
(B) (i)–(3), (ii)–(5), (iii)–(4), (iv)-(2)
(C) (i)–(4), (ii)–(4), (iii)–(5), (iv)-(2)
(D) (i)–(5), (ii)–(2), (iii)–(3), (iv)-(1)
Q.७३. पूर्वास्पृश्य महार व मांग या जातींमधील अंतर्गत संघर्षाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती ?
(A) जातीला जात वैरी
(B) मेलेलं पाणी
(C) माझं गाव कुठाय ?
(D) इस्कोट
Q.७४. पुढील ग्रंथांचा कालक्रम सांगा :
(1) भामह : ‘काव्यालंकार’
(2) वामन : ‘काव्यालंकारसूत्रवृत्ती’
(3) दण्डी : ‘काव्यदर्श’
(4) उद्भट : ‘काव्यालंकारसारसंग्रह’
(A) (1) – (3) – (2) – (4)
(B) (1) – (2) – (3) – (4)
(C) (1) – (3) – (4) – (2)
(D) (2) – (1) – (4) – (3)
Q.७५. वामनाने कोणती दोन प्रयोजने मानली ?
(A) यश व अर्थप्राप्ती
(B) धर्म व अर्थ
(C) अशुभनिवारण व कांतासम्मिततयोपदेश
(D) प्रीति व कीर्ति
Q.७६. ‘काव्यस्यात्मा ध्वनि:’ ह्या व्याख्येनुसार ‘ध्वनि’ हा काव्याचा आत्मा मानलेला आहे. मग स्वभावोक्तीचे स्थान कोणते ?
(A) ते काव्य ठरणार नाही
(B) त्याचे रचनासौंदर्य लक्षणीय असते ?
(C) त्यातही ध्वनीचा शोध घेता येतो ?
(D) त्यातील शब्दालंकार महत्वाचे असतात.
Q.७७. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने भक्तीरसाचा पुरस्कार केला ?
(A) रूपगोस्वामी
(B) जगन्नाथ
(C) विश्वनाथ
(D) मम्मट
Q.७८. करूण रसाचा अनुभव सुखदुखःमिश्रित असतो असे कोणाचे मत आहे ?
(A) गुणचंद्र व रामचंद्र
(B) भरत
(C) अभिनवगुप्त
(D) विश्वनाथ
Q.७९. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने रसप्रक्रियेत अनुकरणाला स्थान दिले ?
(A) श्री शंकुक
(B) भट्ट लोल्लट
(C) अभिनवगुप्त
(D) अप्पय्यदीक्षित
Q.८०. ‘बचेंगे तो और बी लढेंगे’ हा प्रसंग कोणत्या बखरीमधील आहे ?
(A) भाऊसाहेबांची बखर
(B) महिकावतीची बखर
(C) शिंदेशाही बखर
(D) राक्षसतागडीची
Q.८१. छ. राजाराम यांच्या आज्ञेने जिंजी येथे कोणत्या बखरीचे लेखन केले आहे ?
(A) श्री शिवदिग्विजय
(B) सभासदी बखर
(C) महिकावतीची बखर
(D) एक्क्याण्णव कलमी बखर
Q.८२. ‘काय सांगू तारीफ सये जणू इंद्र बैसला सभे वीरासन घालून ग, भवते देशोदेशिचे सुभे’ ही रचना कोणत्या शाहिराची आहे ?
(A) होनाजी बाळा
(B) अनंत फंदी
(C) पट्टे बापूराव
(D) सगन भाऊ
Q.८३. ‘स्पंदकारिका’ या ग्रंथाचा कर्ता कोण ?
(A) उत्पलाचार्य
(B) भट्ट कल्लुचार्य
(C) मम्मट
(D) रुद्रट
Q.८४. ‘साहित्यसमीक्षा ही संज्ञा साहित्यशास्त्र व साहित्यसमीक्षा अशा दोन्ही अर्थाने वापरू नये’ हे मत कोणी मांडले आहे ?
(A) रेने वेलेक
(B) प्लेटो
(C) अॅरिस्टॉटल
(D) रेमंड विल्यम्स
Q.८५. द.ग.गोडसे यांनी समीक्षेमध्ये कोणत्या नव्या संकल्पनेचे उपयोजन केले आहे ?
(A) मानुषता
(B) पोत
(C) सांस्कृतिक वर्चस्व
(D) लय
Q.८६. स्वप्नरचनेतील कोणता व्यापार हा साहचर्याच्या तत्वावर आधारलेला असतो ?
(A) मूल्यविवेक
(B) स्थानांतर
(C) प्रतीकनिर्मिती
(D) प्रतिमासृष्टी
Q.८७. ‘नाटसम्राट’ पाहताना मन भरून आले व डोळे पाणावले’ हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निदर्शक आहे ?
(A) रुपवादी
(B) मानसशास्त्रीय
(C) आस्वादक
(D) चरित्रात्मक
Q.८८. ‘नाटकी निबंध’ या लेखसंग्रहामध्ये कोणत्या समीक्षापद्धतीचे उपयोजन केले आहे ?
(A) ऐतिहासिक
(B) मानसशास्त्रीय
(C) आस्वादक
(D) मार्क्सवादी
Q.८९. ‘नाट्यं भिन्नरूचैर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्’ हे लक्षण कोणी सांगितले आहे ?
(A) भरतमुनी
(B) मम्मट
(C) भवभूती
(D) कालिदास
Q.९०. ‘चरित्रा’तील सत्याचे स्वरूप कशाप्रकारचे असते ?
(A) सार्वत्रिक
(B) वस्तुनिष्ठ
(C) व्यक्तीसापेक्ष
(D) शाश्वत
Q.९१. ‘लिरिक इज मेटॅफर एक्स्टेंडेड’ हा शब्दप्रयोग भावकवितेच्या संदर्भात कोणी योजिला आहे ?
(A) हर्बर्ट रीड
(B) क्लाइव्ह बेल
(C) अॅरिस्टॉटल
(D) सी.डी. लेविस
Q.९२. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे कोणते वैशिष्ट्य ‘रोजनिशी’तून प्रकर्षाने प्रकटते ?
(A) व्यासंग
(B) बहिर्मुखता
(C) चिंतनशीलता
(D) समाजभिमुखता
Q.९३. ‘पथनाट्या’च्या सादारीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ?
(A) संदेशप्रवणता
(B) अभिनयक्षमता
(C) सांगीतिकता
(D) लवचिकता
Q.९४. ‘लंपन’ ही व्यक्तिरेखा कोणी निर्मिला आहे ?
(A) चिं. वि. जोशी
(B) शरच्चंद्र चिरमुले
(C) प्रकाश नारायण संत
(D) भा.रा. भागवत
Q.९५. ‘कॉमिक एपिक पोएम इन प्रोझ’ हे वर्णन कोणत्या महाकाव्याचे आहे?
(A) महाकाव्य
(B) कविता
(C) कादंबरी
(D) शोकांतिका
Q.९६. ‘सभासदाची बखर’ ही शिवकालावरील पहिली बखर असूनम समकालीन शिवाजी महाराज्यांचे लिहिलेले पहिले चरित्र म्हणूनही अनन्यसाधारण महत्व आहे.
(A) संपूर्ण विधान बरोबर
(B) संपूर्ण विधान चूक
(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
(D) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
Q.९७. ‘रमाकांत’ हे पत्र पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीतील आहे ?
(A) एकच प्याला
(B) गिधाडे
(C) पायी चालणार
(D) जेव्हा मी जात चोरली होती
Q.९८. ‘सरव्या पंढरीच्या नाथा | मज कृपा करी आता ||
ऐसे करी अखंडित | शुध्दनेम शुद्ध व्रत |
या अभंगाचा करता कोण
(A) संत तुकाराम
(B) एकनाथ
(C) महदंभा
(D) संत जनाबाई
Q.९९. ‘सूर्योदय बघायला जमलेली माणसं’ ही कोणाची रचना आहे ?
(A) नामदेव ढसाळ
(B) अरुण कोल्हटकर
(C) प्रफुल्ल शिलेदार
(D) भालचंद्र नेमाडे
Q.१००. संत तुकारामांच्या वैकुंटगमनाच्या प्रसंगाचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीतून आले आहे ?
(A) पायी चालणार
(B) भाजकी वही
(C) आनंद ओवरी
(D) शोभायात्रा