2020 Marathi MH SET exam Paper 2

Adx

set paper 1 books in marathi pdf free download, set english syllabus, set syllabus for english, set exam syllabus english literature, set paper 1 study material pdf in marathi, set life science syllabus, सेट परीक्षा प्रश्नपत्रिका, set commerce syllabus, set exam mathematics syllabus pdf, set paper 1 books pdf free download, english set exam syllabus, library science question papers with answers pdf, set exam library science question papers with answers pdf, mh set paper 1 book pdf, set paper 1, set sociology syllabus, set syllabus life science, set computer science syllabus, set mathematics syllabus, set sanskrit question paper, set economics syllabus, library science set exam question paper in marathi, social work set exam question papers, set life science syllabus pdf, set paper 1 syllabus in marathi, set physics syllabus, set exam paper 1 books pdf, set syllabus for chemistry, set exam syllabus for physics pdf, set exam syllabus for computer science, set political science syllabus, set psychology syllabus, set exam syllabus for chemistry pdf,



Q.१.  साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा मुख्यत्वे कोणते वेगळेपण असते ?

(A) शब्द्संग्रहांचा वापर

(B) व्याकराणिक रचना

(C) ध्वनींची योजना

(D) अर्थांची प्रसारणशीलता



Q.२. भाषेच्या लिखित रूपापेक्षा मौखिक भाषा चल, परिवर्तनशील असतात; त्यामुळे मौखिक रुपात दर्जेदार साहित्य निर्माण होऊ शकत नाही.

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

(D) संपूर्ण विधान चुकीचे

 


Q.३. संधी विचारात समासविचारापेक्षा कोणता निराळा घटक प्रस्तुत असतो ?

(A) अर्थान्वय

(B) शब्दान्वय

(C) ध्वनिप्रक्रीया

(D) प्रत्ययलोप

 


Q.४. ‘ नगरातल्या उद्यानातील आम्रवृक्ष फळांनी लगडले होते.’ – या वाक्यातील करता पुढीलपैकी कोणता ?

(A) नगर

(B) उद्यान

(C) आम्रवृक्ष

(D) फळे

 


Q.५. विशेष्याच्या नंतर येणाऱ्या विशेषणास काय म्हणतात ?

(A) गुणविशेषण

(B) सिद्धविशेषण

(C) अधिविशेषण

(D) विधिविशेषण

 


Q.६. ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ ही रचना पुढीलपैकी कोणत्या वृत्तात आहे ?

(A) शार्दूलविक्रीडित

(B) भुजंगप्रयात

(C) आर्या

(D) अनुष्टुभ

 

 

Q.७. एका भाषाकुलामधील भाषांमध्ये कोणत्या प्रकारचे साम्य असते ?

(i) मुलभूत शब्दसंग्रह व रूपव्यवस्था यातील साम्य

(ii) देवानघेवाणीने न आलेले व यादृच्छिक नसलेले साम्य

(A) (i) व (ii)

(B) (i) फक्त

(C) (ii) फक्त

(D) (i) व (ii) दोन्हीही नाही

 


Q.८. पुढीलपैकी कोणता गट आशयबोधक पदिमांचा आहे ?

(A) नदी,देवालय, राजवाडा

(B) टेबल, झाड, माणूस

(C) अनु, प्रति, बे

(D) ने, ला, चा

 


Q.९. पुढीलपैकी कोणता अभ्यासक वर्णनात्मक भाषाभ्यासाशी संबंधित नाही ?

(A) लबव

(B) ब्लूमफिल्ड

(C) सोस्यूर

(D) चॉम्स्की

 


Q.१०. विविध भाषिक पर्यायांचा सामाजिक संदर्भानुसार योग्य वापर करण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते ?

(A) भाषिक क्षमता

(B) व्याकरणिक क्षमता

(C) संज्ञापन क्षमता

(D) वत्कृत्व क्षमता

 


Q.११. एखादी बोली प्रमाणभाषा म्हणून मान्यता पावण्यास ऐतिहासिक,सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती कारणीभूत असते; एरवी भाषावैज्ञानिकदृष्ट्या अन्य बोलीन्पेक्षा ती वेगळी नसते.

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

(D) संपूर्ण विधान चुकीचे

 


Q.१२. पुढीलपैकी कोणते अविष्कार माध्यम संधी देणारे आहे ?

(A) मुद्रित ग्रंथ

(B) नियतकालिक

(C) ब्लॉग

(D) ई-बुक

 


Q.१३. पुये येथे संपन्न झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष कोण होते?

(A) मधु मंगेश कर्णिक

(B) आनंद यादव

(C) ग. ल. ठोकळ

(D) प्राचार्य देवदत्त दाभोळकर

 


Q.१४. वाङ्मय प्रसाराच्या कार्यात सर्वाधिक वाटा पुढीलपैकी कोणत्या घटकाचा असतो ?

(A) संपादक

(B) लेखक

(C) प्रकाशक

(D) वितरक

 


Q.१५. जगातल्या महत्वाच्या ग्रंथालयांपैकी एक असणारे आणि मराठी भाषेतील विपुल ग्रंथांनी सजलेले ‘सरस्वती महाल’ ह्या नावाचे ग्रंथालय कोठे आहे ?

(A) कलकत्ता

(B) मुंबई

(C) तंजावर

(D) नवी दिल्ली

 


Q.१६. गो.ब.देवल यांच्या ‘शारदा’ नाटकाच्या शेवटी शंकराचार्याच्या आगमनाचा आणि निवाडा करण्याचा प्रसंग घालण्यातून लेखकाचा कोणता हेतू दिसतो ?

(A) ती नाटकाची गरज होती

(B) नाट्यसंकेताचा अनुसरणाचा हेतू

(C) प्रेक्षकानुन याचा हेतू

(D) तत्कालीन सांस्कृतिक दडपणाचा परिणाम

 


Q.१७. “ एका काट्याच्या अणीवर बसली तीन गावं

दोन ओसाड वा एक वसेचि ना

वसेचिना वसेचिना, तेथे आले तीन कुंभार

दोन आंधळे एक दिसेचिना.”

हे भारुड कोणी रचले आहे ?

(A) दासोपंत

(B) एकनाथ

(C) नामदेव

(D) ज्ञानदेव

 


Q.१८. “रे. बाबा पदमनजी म्हणजे मराठी ख्रिस्ती सारस्वताचे जनक होत. त्यांच्या हातून बनलेली मराठी पुस्तके वजा केली तर आज मराठी ख्रिस्ती वाङ्मय असून नसल्यासारखे होईल” हे उद्गार कोणाचे आहेत ?

(A) भास्कर दामोदर पाळंदे

(B) ना. वा. टिळक

(C) फादर फ्रांसिस दिब्रोटो

(D) विश्वनाथ नारायण मंडलिक

 


Q.१९. ‘संयुक्त महाराष्ट्राचा गंधाल’ कोणी लिहिला आहे ?

(A) शाहीर आत्माराम पाटील

(B) शाहीर गोपाळराव सुर्वे

(C) शाहीर भिका पाटील

(D) शाहीर करीम शेख

 


Q.२०. “सत्यशोधकी जलशांचीच एक विकसित अवस्था आंबेडकरी जलशांच्या रूपाने कार्यान्वित झाली आणि त्यामुळे नवे तरुण आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले.”

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

 


Q.२१. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोण अध्यक्ष असताना, ते उधळले गेले होते ?

(A) गंगाधर गाडगीळ

(B) प्रभाकर पाध्ये

(C) पु. भा. भावे

(D) व्यंकटेश माडगुळकर

 


Q.२२. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाविना कुठे पार पडले ?

(A) वर्धा

(B) प्रवरानगर

(C) वाई

(D) महाबळेश्वर

 


Q.२३. ‘मॅकबेथ’ या शेक्सपिअरच्या नाटकांचा मराठीत अनुवाद कोणी केला ?

(A) राम गणेश गडकरी

(B) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

(C) गोविंद बल्लाळ देवल

(D) वि. वा. शिरवाडकर

 


Q.२४. “अनुकरण हे वरवरचे असते.ते बाह्य वाङ्मय-घटकांपुरतेच सीमित असते.”

(A) वरील विधान संपूर्णतः सत्य आहे

(B) वरील विधानातील पूर्वार्ध सत्य असला तरी उत्तरार्ध सत्य नाही.

(C) वरील विधानातील पूर्वार्ध सत्य नाही, परंतु उत्तरार्ध मात्र सत्य नाही.

(D) वरील विधान संपूर्णतः असत्य आहे

 


Q.२५. ‘शेक्सपिरिअन सॉनेट’ मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ?

(A) नऊ आणि पाच

(B) दहा आणि चार

(C) बारा आणि दोन

(D) आठ आणि सहा


 

Q.२६. संपूर्ण भारतीय साहित्याच्या इतिहासात प्रथमपुरुषी निवेदनपद्धती पहिल्यांदा मोरोपंतांनी तीन रामायणांमध्ये समर्पक रीतीने वापरली, ती तीन रामायणे कोणती ?

(A) ‘सीता रामायण’,’हनुमंत रामायण’ आणि ‘सद्गुरु रामायण’

(B) ‘सीता रामायण’,’हनुमंत रामायण’ आणि ‘मंत्र रामायण’

(C) ‘दाम रामायण’,’हनुमंत रामायण’ आणि ‘सद्गुरु रामायण’

(D) ‘सीता रामायण’,’निरोष्ठ रामायण’ आणि ‘सद्गुरु रामायण’


 

Q.२७. “तौलनिक समीक्षेचा जनक” असे कोणास म्हटले जाते ?

(A) जॉन ड्रायडन

(B) मॅथ्यू आर्नोल्ड

(C) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

(D) हरी नारायण आपटे


 

Q.२८. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीवरून दिसून येतो ?

(A) मर्ढेकरांची कविता

(B) वि. वा. शिरवाडकर यांची कादंबरी ‘वैष्णव’

(C) पु. शि. रेगे यांची कविता

(D) बाबूराव बागुल यांची लघुकादंबरी ‘सूड’


 

Q.२९. नॅशनल बुक ट्रस्टने भारतीय भाषांमधील साहित्य – कृतींची भाषांतरे प्रकाशित करण्याच्या उपक्रमास काय नाव दिले आहे ?

(A) भाषांतरमाला

(B) आदानप्रदान

(C) रुपांतरमाला

(D) आंतरभारती


 

Q.३०. तौलनिक साहित्य या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक कोणते ?

(A) वसंत बापट : “तौलनिक साहित्याभ्यास”

(B) चंद्रशेखर जहागीरदार : “तौलनिक साहित्याभ्यास तत्वे आणि दिशा”

(C) आनंद पाटील : ‘मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव’

(D) आनंद पाटील : “तौलनिक साहित्य : नवे सिद्धांत आणि उपयोजन’


 

Q.३१. मराठी वाङमयीन संस्कृतीत कोणत्या दोन प्रक्रियांची सरमिसळ होत गेली ?

(A) भाषांतर आणि टीका

(B) टीका आणि भाष्य

(C) पाश्चात्यीकरण आणि संस्कृतीकरण

(D) प्रभाव आणि प्रभव


 

Q.३२. ‘यमुना पर्यटन’ या कादंबरीचा अपवाद प्रारंभीच्या काळातील मराठी कादंबऱ्या कोणत्या प्रकारच्या होत्या ?

(A) आत्मनिवेदनात्मक

(B) संवादप्रचुरता

(C) सामाजिक विश्लेषण

(D) रंजनवादी

 


Q.३३. लोकसाहित्यविषयक अभ्यासातील ‘भारतमूलक’ सिद्धांत कोणी मांडला ?

(A) जेम्स फॅरेर

(B) ज्युलिअस क्रोन

(C) ए. बी. टायलर

(D) थिओडोर बेनेफ

 


Q.३४. लोकसाहित्याभ्यासात वर्नाणात्मक अभ्यास - पद्धतीचा वापर करून कोडी, उखाणे यांचा अभ्यास कोणी केला ?

(A) कार्ल अब्राहिम

(B) ज्युलिअस क्रोन

(C) रॉल्फ कॉक्स

(D) आर्चर टायलर

 


Q.३५. लोक सांस्कृतिक दृष्टीकोनातून दैवतकथांचा अभ्यास करणारा मराठीतील अभ्यासक कोण ?

(A) ग. ह. खरे

(B) रा. चिं. ढेरे

(C) द. वा. पोतदार

(D) वि. का. राजवाडे


 

Q.३६. भारतात लोकसाहित्याच्या अभ्यासाला केव्हा गती मिळाली ?

(A) शिवाजी महाराजांच्या काळात

(B) इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर

(C) संत साहित्य प्रसृत झाल्यानंतर

(D) भाषाविचारांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर

 


Q.३७. जोड्या लावा.

यादी (१)

(1) वैजनाथ कळसे    

(2) वसंत मून       

(3) गौतम कावळे     

(4) भगवान इंगळे    

यादी (२)

(5) दगडफोड्या

(6) ढोर

(7) वस्ती

(8) बावळट

(9) आयरीनच्या घना

पर्याय :

(A) 1-8, 2-5, 3-7, 4-6

(B) 1-9, 2-7, 3-5, 4-6

(C) 1-9, 2-5, 3-8, 4-7

(D) 1-9, 2-7, 3-8, 4-6

 


Q.३८. पुढीलपैकी कोणाचे लेखन सर्वप्रथम ‘अस्मिता’ मधून प्रकाशित झाले ?

(A) गंगाधर पानतावने

(B) बाबुराव बागुल

(C) प्र. ई. सोनकांबळे

(D) लक्ष्मण गायकवाड

 


Q.३९. ‘अंतःस्थ’ हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?

(A) उषा अंभोरे

(B) हिरा बनसोड

(C) प्रज्ञा लोखंडे

(D) ज्योती लांजेवार

 


Q.४०. उद्धव शेळके कथेतून व्यक्तिचित्रे रेखाटताना त्यांच्या बाह्यांगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन घडवताना तथापि त्यांचे हे वैशिष्ट्य कथेला वाङयीनदृष्ट्या कमकुवत करते.”

(A) पूर्ण विधान बरोबर आहे

(B) पूर्ण विधान चुक आहे

(C) विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर

(D) विधानाचा फक्त उत्तरार्ध बरोबर

 


Q.४१. ‘घुंगरू’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

(A) शंकर खंडू पाटील

(B) उद्धव शेळके

(C) ग. ल. ठोकळ

(D) द. मा. मिरासदार

 


Q.४२. ‘कडुलिंबाची सावली’ हा कथासंग्रह कोणाचा आहे ?

(A) शंकर पाटील

(B) उद्धव शेळके

(C) रा. र. बोराडे 

(D) प्रतिमा इंगोले

 


Q.४३. मध्ययुगीन वाङमयेतिहासाच्या व्यवस्थापनासाठी आधार म्हणून पुढीलपैकी कोणत्या घटकाचा विचार करता येत नाही ?

(A) लोकसंस्कृतीचे घटक

(B) सांप्रदायिक प्रेरणा

(C) राज्यव्यवहाराशी संबंधित लेखन

(D) आत्मानुभूती

 


Q.४४. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे व्यवस्थापन करताना निराळा व्यूह स्वीकारणे आवश्यक ठरते;कारण तत्कालीन संदर्भात ‘वाङ्मय’ या संज्ञेची कल्पना आणि व्याप्ती आधुनिक काळापेक्षा वेगळी असणार.

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(C) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

(D) संपूर्ण विधान चुकीचे

 


Q.४५. घटना आणि घटनाशोधाची सामग्री म्हणजे इतिहास नव्हे, ही जाणीव कोणी करून दिली ?

(A) इ. एच. कार

(B) तेन

(C) विष्णुशास्त्री  चिपळूणकर

(D) वि. का. राजवाडे

 


Q.४६. अंशलक्ष्यी (अॅटमिस्ट हिस्टरी) व समग्रलक्ष्यी (ऑरगॅनिक हिस्टरी) या लेखनप्रणालींच्या विशेषांचे अचूक वर्णन कोणी केले आहे ?

(A) ऑस्टिन वॉरेन

(B) आर. एस. क्रेन

(C) सर ल्युईस नेमिअर

(D) एल. सी. नाईट्स


 

Q.४७. नामदेवें केलें स्वप्नामाजीं जागे | सवें पांडुरंगें येवोनिया |

सांगितलें काम करावें कवित्व | वाउगें निमित्य बोलों नको ||

हे उद्गार कोणाचे आहेत ?

(A) रामदास

(B) परिसा भागवत

(C) तुकाराम

(D) कान्होपात्रा

 


Q.४८. ‘जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी |

म्रुत्युचिये भेटी जवळी आली’ या तुकोबांच्या अभंगावरून त्यांचे आयुर्मान ८० – ८१ वर्षांचे असावे, असे वि. का. राजवाडे मानतात.

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(C) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

(D) संपूर्ण विधान चूक

 


Q.४९. अल्ला निरंजन दोऊ नाही रे |

समज्यत समज्यन हारो |

भाई काहे कू लडते | लडते सो पडते भाई ||

असा उपदेश कोणी केला ?

(A) रामदास

(B) एकनाथ

(C) निळोबा

(D) कल्याणस्वामी

 


Q.५०. ते दिवशी पृथ्वीकंप जाहला.गगनी धुमकेतू उदेला. उत्कापात आकाशाहून झाला. श्रीशंभूमहादेवीं तळ्याचे उदक रक्तांबर झाले. असे शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगीचे वर्णन कोठे आले आहे ?

(A) सभासदाच्या बखरीत

(B) एक्क्याण्णव कलमी बखरीत

(C) सप्तप्रकरणात्मक चरित्रात

(D) भोसले वंश चरित्रात



Q.५१. आधुनिक भारत हा ग्रंथ कोणी लिहिला ?

(A) शंकर दत्तात्रय जावडेकर

(B) सखाराम जगन्नाथ भागवत

(C) श्रीनिवास नारायण बनहट्टी

(D) धनंजय रामचंद्र गाडगीळ

 


Q.५२. पुढीलपैकी माणिक वर्मा यांचे आत्मकथन कोणते ?

(A) स्वरवंदना

(B) स्वरमयी

(C) किती रंगला खेळ

(D) माझ्या संगीत जीवनाची वाटचाल

 


Q.५३. संगीतातील घराणी या ग्रंथाचे लेखक कोण ?

(A) गोपालकृष्ण भोबे

(B) बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी

(C) नी. म. केळकर

(D) ना. र. मारुलकर

 


Q.५४. लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, भारतीय लोकसत्ता, इहवादी शासन, महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथाचे लेखक कोण ?

(A) गं. बा. सरदार

(B) लक्ष्मणशास्त्री जोशी

(C) चिं. वि. वैद्य

(D) पु. ग. सहस्रबुद्धे

 


Q.५५. मराठी स्त्री-लेखिकांची सूची (१८७३-१९२०) कोणी सिद्ध केली ?

(A) पुष्पा भावे

(B) सरोजिनी वैद्य

(C) ग. र. दंडवते

(D) दु. का. संत

 


Q.५६. पुढील कथासंग्रह प्रकाशनकाळानुसार लिहा :

अज्ञात झऱ्यावर , पश्चिमकडा , विदेही, जमुनाके तीर

(A) पश्चिमकडा , जमुनाके तीर, विदेही, अज्ञात झऱ्यावर

(B) जमुनाके तीर, विदेही, पश्चिमकडा, अज्ञात झऱ्यावर

(C) अज्ञात झऱ्यावर, विदेही, जमुनाके तीर, पश्चिमकडा

(D) विदेही, अज्ञात झऱ्यावर, पश्चिमकडा, जमुनाके तीर

 


Q.५७. पुढीलपैकी कोणती नाटके अजित दळवी यांनी लिहिली आहेत ?

(A) प्रतिबिंब, वासांसि जीर्णानि, क्षितिजापर्यंत समुद्र, आत्मकथा

(B) मामका : पांडवाक्ष्चैव, अंधारयात्रा, विष्णुगुप्त चाणक्य, रस्ते

(C) पाहुणा, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, स्थळ : स्नेहमंदिर

(D) मुक्तिधाम, शतखंड, संघर्ष, देहधून

 


Q.५८. ‘तंबी दुराई’ या टोपणनावाने लेखन करणारे कोण आहेत ?

(A) जयवंत दळवी

(B) श्रीकांत बोजेवार

(C) विजय नेने 

(D) के. ज. पुरोहित

 


Q.५९. ‘सोनिया’ यांचे खरे नाव कोणते आहे ?

(A) सुनंदा कुलकर्णी

(B) आशालता कुलकर्णी

(C) पूजा कुलकर्णी

(D) स्नेहल कुलकर्णी

 


Q.६०. ‘फुले - आंबेडकरी संशोधनातील प्रदुषणे’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

(A) चां. भ. खैरमोडे

(B) शंकरराव खरात

(C) राजा ढाले

(D) वसंत मून

 


Q.६१. दलित समाजाची अवहेलना करणाऱ्या उच्चभ्रू वर्गाची मानसिकता चित्रित करणारी ‘जागर’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?

(A) केशव मेश्राम

(B) सुधाकर गायकवाड

(C) मुरलीधर जाधव

(D) प्रेमानंद गज्वी

 


Q.६२. तिसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले ?

(A) अमरावती

(B) नासिक

(C) किनवट

(D) नंदुरबार

 


Q.६३. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षरत असणारी ‘शेतकरी संघटना’ ही चळवळ लढाऊ होती परंतु ग्रामीण साहित्याचे हित ध्यानात आल्यामुळे या संघटनेने सौम्य रूप धारण केले.”

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(D) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

 


Q.६४. अनन्वित छठामुळे हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या दलितांच्या धर्मांतराचे सत्य घटनेवर आधारित चित्रण पुढीलपैकी कोणत्या नाटकात आढळते ?

(A) बामणवाडा

(B) साक्षीपुरम

(C) आधारस्तंभ

(D) वांझ माती

 


Q.६५. वाङ्मयीन नियतकालिके पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे बंद पडतात ?

(A) पुरेसे कसदार साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे

(B) सर्व मराठी साहित्यविश्वाचे पुरेसे प्रतिनिधित्व होत नसल्यामुळे

(C) प्रस्तुतता आणि प्रयोजन संपल्यामुळे

(D) संपादकाचा उत्साह मावळल्यामुळे

 


Q.६६. नवसाहित्याचा व प्रयोगशीलतेचा पुरस्कार करून वाङ्मयीन नियतकालिकांची संकल्पना अधिक विकसित करणारे नियतकालिक कोणते ?

(A) पारिजात

(B) अभिरुची

(C) रत्नाकर

(D) यशवंत

 


Q.६७. ‘ती जनता अमर आहे’ ही विंदा करंदीकरांची कविता कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती ?

(A) अभिरुची

(B) सत्यकथा

(C) मौज

(D) पंचधारा

 


Q.६८. दुष्काळी कामावर राबणाऱ्या स्त्रियांचे मुकादमाकडून होणार्या लैंगिक शोशांचे चित्रण भास्कर चंदनशिव यांनी कोणत्या कथेत केले आहे ?

(A) अंगारमाती

(B) वाळवी

(C) माती

(D) पोळ

 


Q.६९. ‘अचाट गावची अफाट मावशी’ हे बालनाट्य कोणत्या संस्थेने सादर केले ?

(A) चिल्ड्रन्स थिअटर

(B) लिटल थिअटर

(C) बालनाट्य

(D) चंद्रशाळा

 


Q.७०. २२ मार्च १९७० रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली ?

(A) हुसेन जमादार

(B) हमीद दलवाई

(C) हुसेन दलवाई

(D) फकरुद्दीन बेन्नूर

 


Q.७१. कादंबरीतून साहित्य संमेलनाच्या बऱ्या - वाईट गोष्टींचे चित्रण कोणत्या लेखकाने केले आहे ?

(A) द. ता. भोसले

(B) वासुदेव मुलाटे

(C) रंगनाथ पठारे

(D) नागनाथ कोत्तापल्ले

 


Q.७२. ‘कारखान्यातील कामगार आणि शेतकरी एकत्र येऊन ‘भांडवल सुरा’ विरोधात उभे राहिले पाहिजे’ हा विचार कोणी मांडला ?

(A) छ. शाहू महाराज

(B) महर्षी वि. रा. शिंदे

(C) कृष्णराव भालेकर

(D) भाई माधवराव बागल

 


Q.७३. भा. वि. वरेरकर यांची मार्क्सवादी विचार मांडणारी कादंबरी कोणती ?

(A) धावता धोटा

(B) विधवाकुमारी

(C) अश्रू

(D) भंगलेले देऊळ

 


Q.७४. मम्मटाच्या काव्यलक्षणातील प्रत्येक शब्दावर घणाघाती टीका करून ते काव्यलक्षण निरर्थक कोणी ठरवले ?

(A) जगन्नाथ

(B) विश्वनाथ

(C) अप्पय्यदीक्षित

(D) अभिनवगुप्त


 

Q.७५. प्रतीभाशक्तीची व्याख्या करताना ‘प्रज्ञा’ ही  संज्ञा कोणत्या समीक्षकांनी वापरली आहे?

(A) दंडी, मम्मट व वाग्भट

(B) वाग्भट, हेमचंद्र व अभिनवगुप्त

(C) जगन्नाथ, अभिनवगुप्त व रुद्रट

(D) दंडी, हेमचंद्र व अभिनवगुप्त


 

Q.७६. काव्यानंद मीमांसेत ‘चमत्कृति’ या संज्ञेचा आग्रह कोणी धरला ?

(A) क्षेमेंद्र

(B) जगन्नाथ

(C) मम्मट

(D) कुन्तक


 

Q.७७. भरत, दंडी आणि वामन यांनी गुणांची संख्या किती मानली आहे ?

(A) तीन

(B) दहा

(C) चोवीस

(D) दोन

 


Q.७८. ‘काकू’ म्हणजे काय ?

(A) बोलताना विशिष्ट सुरात होणारी अर्थनिश्चिता

(B) नातेवाईक स्त्री

(C) संस्कृतप्रचुरता

(D) देशी शब्दांचा भरणा


 

Q.७९. पुढीलपैकी कशाचा समावेश रसविघ्नांमध्ये करता येईल ?

(A) निजसुखादिविवशीभाव

(B) दुर्बोधता

(C) चित्त एकाग्र न होणे

(D) भाषाविषयक अज्ञान

 


Q.८०. ‘लीलाविश्वंभर’ हा प्रभूलिंगलीले या कन्नड ग्रंथाचा अनुवाद असून यात बसवेश्वरांचे चरित्र वर्णिले आहे.

(A) संपूर्ण विधान बरोबर

(B) संपूर्ण विधान चूक

(C) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(D) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक


 

Q.८१. ‘रुक्मिणीहरण’ ही रचना कोणी केली आहे ?

(A) मोरोपंत

(B) गुणकिर्ती

(C) मुकुंदराज

(D) दामोदर पंडित


 

Q.८२. ‘कुशलवोपाख्यान’ या काव्याचा कर्ता मोरोपंत हे असून, त्यांनी ते द्वारकाविजय कथेच्या आधारे लिहिले आहे.

(A) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

(B) संपूर्ण विधान बरोबर

(C) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

(D) संपूर्ण विधान चूक

 


Q.८३. ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाचा कर्ता कोण ?

(A) कवी नरेंद्र

(B) संत एकनाथ

(C) रमावल्लभदास

(D) मुक्तेश्वर


 

Q.८४. विशिष्ट साहित्यकृतीचे सूक्ष्म व काळजीपूर्वक वाचन कोणत्या प्रकारच्या समीक्षेत अभिप्रेत असते ?

(A) शुद्ध समीक्षा

(B) ऐतिहासिक समीक्षा

(C) सैद्धांतिक समीक्षा

(D) उपयोजित समीक्षा


 

Q. ८५. ‘आस्वादक समीक्षेचे’ प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ?

(A) उत्कट आत्मप्रत्यय

(B) विशिष्ट विचारव्यूह

(C) तार्किकता 

(D) चिकित्सकता


 

Q.८६. ‘सरासरी वाचक’ आणि ‘विविध शैलीगत क्लुप्त्यांचा मिलाफ’ या दोन संकल्पना कोणी मांडल्या आहेत ?

(A) जे. पी. थोर्न

(B) सॅम्यूएल. आर. लेविन

(C) मायकेल रीफाटेरे

(D) जे. सिंक्लेअर



Q.८७. ‘उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांच्या भावविश्वाचे चित्रण असल्यामुळे गौरी देशपांडे यांच्या साहित्यातून कृतक – दुःखाची अभिव्यक्ती होते’ हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निदर्शक आहे  ?

(A) मानसशास्त्रीय

(B) ऐतिहासिक

(C) समाजशास्त्रीय

(D) रुपवादी

 


Q.८८. ‘कादंबरी’च्या साहित्यशास्त्राचा ऊहापोह करताना ‘कथनाचे करार’ ही संकल्पना कोणी मांडली आहे ?

(A) जोनाथन कलर

(B) मॉड बॉडकीन

(C) अॅरिस्टॉटल

(D) आय. ए. रिचर्ड्स


 

Q.८९. ‘चार ऋतुंशी निगडीत असलेल्या आदिम मिथ्यकथांमधून वाङ्मय प्रकारांचा उद्भव झाला’ असे मत कोणी मांडले आहे ?

(A) रोलां बार्थस

(B) रेने नेलेक

(C) नॉथ्रॉप फ्राय

(D) टी. एस. इलियट

 


Q.९०. ‘आजकालच्या गोष्टी’ कोणी लिहिल्या आहेत ?

(A) ह. ना. आपटे

(B) वि. सी. गुर्जर

(C) नाथमाधव

(D) गो. ना. दातार

 


Q.९१. मुद्राक्षरकलेतील आकार व सौंदर्य तत्व केंद्रस्थानी ठेऊन ‘कविते’चे दृश्यरूप कोणी अधोरेखित केले आहे ?

(A) कमल शेगडे

(B) जयंत जोशी

(C) र. कृ. जोशी

(D) बाळ ठाकूर



Q.९२. ‘ललित गद्या’चे प्रधान लक्षण कोणते आहे ?

(A) रमणीय अर्थ प्रतिपादकता

(B) वैचारिक स्पष्टता

(C) काव्यात्मकता

(D) ‘मी’ त्वाच्या व्यक्तित्वविशेषांचा आविष्कार

 


Q.९३. तर्कसंगत युक्तिवाद व खंडनमंडन ही कोणत्या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये आहेत ?

(A) वैचारिक निबंध

(B) लघुनिबंध

(C) चरित्र

(D) रसग्रहण

 


Q.९४. पुढीलपैकी कोणत्या विचारवंताची रोजनिशी प्रकाशित झाली आहे ?

(A) महात्मा जोतीबा फुले

(B) विठ्ठल रामजी शिंदे

(C) कृष्णराव भालेकर

(D) विष्णुबुवा ब्रम्हचारी


 

Q.९५. भारतातील पथनाट्याचे प्रेरणास्थान कोणास मानले जाते ?

(A) गिरीश कार्नाड

(B) बादल सरकार

(C) मोहन राकेश

(D) बी. व्ही. कारंथ

 

Q.९६. योग्य जोड्या लावा :

ग्रंथ

(a) नरेंद्र

(b) नारायणबास बहाळीये

(c) भास्कर

(d) दामोदर

(e) विश्वनाथ बाळापूरकर

ग्रंथकार

(i) ज्ञानप्रबोध

(ii) रुक्मिणी स्वयंवर

(iii) वच्छाहरण

(iv) ऋद्धीपूरवर्णन

(v) सह्याद्री वर्णन

(vi) उद्धव गीता

पर्याय :

(A) a-(i)   b-(vi)   c-(iv)   d-(ii)   e-(v)

(B) a-(i)   b-(ii)   c-(iii)   d-(iv)   e-(v)

(C) a-(ii)   b-(iv)   c-(vi)   d-(iii)   e-(i)

(D) a-(vi)   b-(ii)   c-(iii)   d-(i)   e-(iv)


 

Q.९७. “शिशुपाळ वरू ऐसें आईकिले बाळा :

भुपातली निर्हां जाली व्याकुळा:”

(A) रुक्मिणी स्वयंवर

(B) महदंबेचे धवळे

(C) शिशुपालवध

(D) श्री दत्तात्रेय बाळक्रीडा

 


Q.९८. पुढीलपैकी कोणत्या प्रसंग म. फुलेकृत शिवाजी महाराजांचा पवाडा या काव्यग्रंथात आला नाही ?

(A) रायरेश्वराची शपथ

(B) काशीकर गंगाभटाचा खेळ

(C) आग्र्याहून सुटका 

(D) शाहिस्तेखानाची स्वारी

 


Q.९९. पुढीलपैकी कोणती कविता स्त्री मनातील दुःखाचा ठाव घेते ?

(A) पायी चालणार

(B) जनरल वार्ड

(C) त्रिमेरी

(D) खळीळ पाण्यात

 


Q.१००. लग्नविधीतील ‘झालू’ गीताचा उल्लेख पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीमध्ये आला आहे ?

(A) जिणं आमुचं

(B) स्मृतिचित्रे

(C) मराठी गौळणी

(D) आयदान 



Post a Comment

Previous Post Next Post
adx.txt google.com, pub-2434827501976909, DIRECT, f08c47fec0942fa0